साधक भगिनींसाठी सुचना
स्री ही देवीस्वरुप आहे तिला आदराने आदिशक्ती असे म्हटले आहे. कारण ती या साऱ्या त्रैलोक्याची जननी आहे. सारे भूतमात्र तिच्याच पोटी निर्माण झाले आहे. तिचा गौरव करायला आपण शिकले पाहिजे.
एकविसावे शकत उजाडले तरीही पुरुष आणि स्री यांच्यात समानता आलेली नाही. तिला नाना प्रकारे छळले जाते. तिच्याकडे केवळ उपभोग्य वस्तु म्हणुन पाहीले जाते. याकरीता भगिनींनी प्रथम स्वतःला बदलले पाहिजे. तिने स्वतःचा सम्मान केला पाहिजे. जी भगिनी सद्गुरुंकडे जाऊन अनुग्रह घेते, तिने तर स्वतःला अबला कधीच समजु नये. कारण तिची परमात्म्याशी एकतानता साधली जाते. नाम जपता जपता ती प्रत्यक्ष भगवंताला प्राप्त करुन घेते. प्रत्यक्ष पांडुरंग मागेपुढे उभा राहुन तिचा सांभाळ करतो. संत जनाबाई, संत मुक्ताबाई, महाराणी ताराबाई, जिजामाता, महाभारत कालिन मैत्रैयी, द्रौपदी, उलपी इ. भाग्यवान स्रिया कणखर होत्या. कोणाचाही अन्याय त्यांनी सहन केला नाही. समाज कणखर व बलवान होण्यासाठी त्या आयुष्यभर झटल्या. प्रत्येक भगिनीने अशा तेजस्वी स्रियांचा आदर्श ठेवावा. असो.
प्रपंच करीत असतांना पांडुरंगाची सतत आठवण ठेवावी. मुलाबाळांवर अध्यात्मिक संस्कार करावेत. त्यासाठी सकाळ संध्याकाळ आरती, हरिपाठ, स्तोत्रे इ. नियमित म्हणण्याचा परिपाठ ठेवावा. मुलांचे फाजील लाड न करता, त्याच्या ममतेत न अडकता, प्रसंगी कठोर होऊन तो चुकल्यास त्यास त्याच्या चुकीचा जाणिव करुन द्यावी. योग्य वेळी मौन राखावे, मुलांना मांसाहाराचे वळण न लावता त्यास शुद्ध शाकाहाराचे महत्व सांगावे. उद्याची चिंता करु नये. सासु-सासरे, नणंद, दीर व पती यांच्याशी प्रेमाने वागावे. अन्याय सहन करु नये. अन्यायाचा शक्तीनिशी प्रतिकार करावा. शेजारणींशी सलोख्याचे संबध ठेवावेत. मनातील गुपीत मनातच ठेवावे. संसारातील न्यून, कमीपणा, मनातील शल्य चारचौघात सांगुन त्याचे प्रदर्शन करु नये.
स्रियांमध्ये शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, राम, कृष्ण यांसारखे तेजस्वी महापुरुष घडवण्याची शक्ती आहे. त्यामुळे भगिनीने स्वतःचा मान ठेवावा. स्री सुखी असेल तर घर-परिवार सुखी व समृध्द होईल. म्हणुन घरातील प्रत्येक पुरुषाने घरातील स्री वर्गाचा आदर व सम्मान करावा. कारण त्यात सर्वांचेच हित सामावलेले आहे.
पुरुषातील वाईट प्रवृत्ती स्रियांना ओळखता येते. त्यामुळे तिने त्या वाईट प्रवृत्तींना खतपाणी न घालता, उत्तेजन न देता त्यांचा निषेध करावा. वाईट प्रवृत्तींचा नायनाट करण्याचे सामर्थ तिच्याजवळ नक्कीच आहे.
नारींचा सन्मान ज्या घरात, ज्या गावात व ज्या देशात केला जातो, त्या घरात, त्या गावात व त्या देशात लक्ष्मी, स्वधर्म व परमार्थ वास करत असतात, तेथे अध्यात्म स्थिर असते.
भगिनी जर अशिक्षित व अडाणी असेल तर सज्ञान होण्याचा प्रयत्न करावा. मुलाबाळांना चांगले ज्ञान द्यावे. मुलांची अंघोळ करतांना प्रत्यक्ष पांडुरंगाचेच स्नान करीत आहोत असाच भाव ठेवावा. सारा परिवार व घर हे पांडुरंगाचेच निवास आहे असे चिंतन करावे. मुलांतील सद्गुणांना वाव द्यावा. समर्थ घर, समर्थ गाव व समर्थ देश घडवण्यास हातभार लावावा. म्हणतात ना.....
।।जिच्या हाती पाळण्याची दोरी। ती राष्ट्राते उद्धारी।।
साधक भगिनीने दैवावर हवाला न ठेवता, मुलांना दैववादी बनवु नये. त्यांना कर्तव्य व ज्ञानार्जन करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. रामायण महाभारत यांतील विररसाच्या गोष्टी सांगुन त्यांचे मन बलवान करावे. भुताखेताच्या गोष्टी सांगुन त्यांना भित्रा व पळपुटा करु नये. व्यायामाचे महत्व सांगुन त्यांची शरीर संपदा वाढवावी. असे प्रत्येक भगिनीने मनापासुन आचरण केल्यास संसार हा सुसह्य होईल व ईश्वराची सेवा आपोआपच होईल यात संशय नाही.
..........डी सिताराम
स्री ही देवीस्वरुप आहे तिला आदराने आदिशक्ती असे म्हटले आहे. कारण ती या साऱ्या त्रैलोक्याची जननी आहे. सारे भूतमात्र तिच्याच पोटी निर्माण झाले आहे. तिचा गौरव करायला आपण शिकले पाहिजे.
एकविसावे शकत उजाडले तरीही पुरुष आणि स्री यांच्यात समानता आलेली नाही. तिला नाना प्रकारे छळले जाते. तिच्याकडे केवळ उपभोग्य वस्तु म्हणुन पाहीले जाते. याकरीता भगिनींनी प्रथम स्वतःला बदलले पाहिजे. तिने स्वतःचा सम्मान केला पाहिजे. जी भगिनी सद्गुरुंकडे जाऊन अनुग्रह घेते, तिने तर स्वतःला अबला कधीच समजु नये. कारण तिची परमात्म्याशी एकतानता साधली जाते. नाम जपता जपता ती प्रत्यक्ष भगवंताला प्राप्त करुन घेते. प्रत्यक्ष पांडुरंग मागेपुढे उभा राहुन तिचा सांभाळ करतो. संत जनाबाई, संत मुक्ताबाई, महाराणी ताराबाई, जिजामाता, महाभारत कालिन मैत्रैयी, द्रौपदी, उलपी इ. भाग्यवान स्रिया कणखर होत्या. कोणाचाही अन्याय त्यांनी सहन केला नाही. समाज कणखर व बलवान होण्यासाठी त्या आयुष्यभर झटल्या. प्रत्येक भगिनीने अशा तेजस्वी स्रियांचा आदर्श ठेवावा. असो.
प्रपंच करीत असतांना पांडुरंगाची सतत आठवण ठेवावी. मुलाबाळांवर अध्यात्मिक संस्कार करावेत. त्यासाठी सकाळ संध्याकाळ आरती, हरिपाठ, स्तोत्रे इ. नियमित म्हणण्याचा परिपाठ ठेवावा. मुलांचे फाजील लाड न करता, त्याच्या ममतेत न अडकता, प्रसंगी कठोर होऊन तो चुकल्यास त्यास त्याच्या चुकीचा जाणिव करुन द्यावी. योग्य वेळी मौन राखावे, मुलांना मांसाहाराचे वळण न लावता त्यास शुद्ध शाकाहाराचे महत्व सांगावे. उद्याची चिंता करु नये. सासु-सासरे, नणंद, दीर व पती यांच्याशी प्रेमाने वागावे. अन्याय सहन करु नये. अन्यायाचा शक्तीनिशी प्रतिकार करावा. शेजारणींशी सलोख्याचे संबध ठेवावेत. मनातील गुपीत मनातच ठेवावे. संसारातील न्यून, कमीपणा, मनातील शल्य चारचौघात सांगुन त्याचे प्रदर्शन करु नये.
स्रियांमध्ये शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, राम, कृष्ण यांसारखे तेजस्वी महापुरुष घडवण्याची शक्ती आहे. त्यामुळे भगिनीने स्वतःचा मान ठेवावा. स्री सुखी असेल तर घर-परिवार सुखी व समृध्द होईल. म्हणुन घरातील प्रत्येक पुरुषाने घरातील स्री वर्गाचा आदर व सम्मान करावा. कारण त्यात सर्वांचेच हित सामावलेले आहे.
पुरुषातील वाईट प्रवृत्ती स्रियांना ओळखता येते. त्यामुळे तिने त्या वाईट प्रवृत्तींना खतपाणी न घालता, उत्तेजन न देता त्यांचा निषेध करावा. वाईट प्रवृत्तींचा नायनाट करण्याचे सामर्थ तिच्याजवळ नक्कीच आहे.
नारींचा सन्मान ज्या घरात, ज्या गावात व ज्या देशात केला जातो, त्या घरात, त्या गावात व त्या देशात लक्ष्मी, स्वधर्म व परमार्थ वास करत असतात, तेथे अध्यात्म स्थिर असते.
भगिनी जर अशिक्षित व अडाणी असेल तर सज्ञान होण्याचा प्रयत्न करावा. मुलाबाळांना चांगले ज्ञान द्यावे. मुलांची अंघोळ करतांना प्रत्यक्ष पांडुरंगाचेच स्नान करीत आहोत असाच भाव ठेवावा. सारा परिवार व घर हे पांडुरंगाचेच निवास आहे असे चिंतन करावे. मुलांतील सद्गुणांना वाव द्यावा. समर्थ घर, समर्थ गाव व समर्थ देश घडवण्यास हातभार लावावा. म्हणतात ना.....
।।जिच्या हाती पाळण्याची दोरी। ती राष्ट्राते उद्धारी।।
साधक भगिनीने दैवावर हवाला न ठेवता, मुलांना दैववादी बनवु नये. त्यांना कर्तव्य व ज्ञानार्जन करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. रामायण महाभारत यांतील विररसाच्या गोष्टी सांगुन त्यांचे मन बलवान करावे. भुताखेताच्या गोष्टी सांगुन त्यांना भित्रा व पळपुटा करु नये. व्यायामाचे महत्व सांगुन त्यांची शरीर संपदा वाढवावी. असे प्रत्येक भगिनीने मनापासुन आचरण केल्यास संसार हा सुसह्य होईल व ईश्वराची सेवा आपोआपच होईल यात संशय नाही.
..........डी सिताराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा