अंतर्मनाची जागृती एक चमत्कार....
साधना...
साधकाने सुखासनात बसावे. दीर्घ श्वास घेऊन तो सोडुन द्यावा. कुंभक वगैरे करु नये. नंतर हळुहळु डोळे बंद करावे. लक्ष्य भ्रुमध्यावर किंवा, टाळुचे ( सहस्रधाराच्या ठिकाणी ) केंद्रित करा.. नंतर तुमच्या आवडत्या देवतेचे मोठ्याने नामस्मरण करा... उच्चार करत असतांना त्या आवाजातील कंप जाणा... नंतर सुमारे तीन चार मिनिटे मोठ्याने नामस्मरण करा... नंतर मात्र दोन नामस्मरणात गॅप ठेवा..पहिले नाम घेतल्यावर थोडे थांबा.....त्या नामाने जी लाट उसळली आहे ती शांत होऊ द्या.. नंतर त्या गॅपवरच लक्ष ठेवा. परत थोड्या वेळाने दुसरे नाम घ्या....अशा प्रकारे दोन नाम मधील गॅप वाढवत चला... व त्या गॅपकडेच अवधान असु द्या. असे करतांना तुम्हाला नकळत गॅप वाढवला गेल्याचा अनुभव येईल.. हिच अवस्था पकडुन ठेवा..कारण ह्या गॅप मधे आपले बाह्यमन हे स्थिर झालेले असते..मन हे एका विषयावरुन उठुन दुसऱ्या विषयांवर जात असतांना जो मधला कालखंड असतो, तेच अंतर्मनाचे स्वरुप होय.. तेच परमात्म्याचे स्वरुप होय.. असो..
दोन नामामधला गॅप वाढवा.. आणखी वाढवा.. उतावळे बनु नका.. विचारांना साक्षी ही राहु नका...आपोआप मन हे निर्विकार होईल... डोळ्यांवर अंमल झोपेचे झापडे येऊ लागेल.....पण झोपु नका... निग्रहाने जागे राहा... पुन्हा नाम घ्या ... गॅप वाढवा... व त्या गॅपकडे पाहा...
हळुहळु मनातील विचार शांत होतील... त्या गॅपमधील स्थिती अनुभवा....यावेळी मन हे सुक्ष्म होऊ लागेल.... भ्रुमध्यभागी किंवा, डोक्यात थोडासा जडपणाचा अनुभव येऊ लागेल...पण तो अल्पकाळच टिकेल... नंतर गोड संवेदना सर्व शरीर भर पसरल्याचा अनुभव येईल...यात अडकु नका...पुन्हा नाम गॅपकडे लक्ष्य ठेवा...गॅप वाढवा...
असे चालु असतांना उठावेसे वाटेल, आळस प्रगट होऊ लागेल...जांभया येऊ लागतील...पायाला रग येईल...भुकेची जाणिव होईल.... असले प्रकार होणे स्वाभाविकच आहे...कारण या साधनेत अल्पकाळ का होईना...बाह्यमनाचा नाश होऊ लागतो...स्वतःचा नाश होणे कोणाला आवडेल.... स्वताःचा नाश होत आहे हे पाहुन बाह्यमनच अशा प्रकारचा अडथळा निर्माण करते...
तुम्ही थांबु नका... पुन्हा नाम घ्या.... व गॅप वाढवा....
मित्रांनो... ही अतिशय दिव्य प्रकारची व प्रभावी साधना आहे. ..तुम्ही जेव्हा या साधनेतुन जागे व्हाल, तेव्हा तुम्हाला अतिशय दिव्य आनंदाचा अनुभव येऊ लागेल.... तुम्हाला या जगताविषयीचे गांभिर्य वाटणार नाही.... तुम्हाला खुपच प्रसन्न वाटु लागेल... आळस वा कंटाळा कोठल्या कोठे पळु गेल्याचा अनुभव येईल.....तुम्हाला खरे तर या साधनेतुन उठावेसेच वाटणार नाही... असे होणे म्हणजेच ही साधना योग्य मार्गाने होत असल्याचे गमक आहे....
या साधनेत जप....तप....प्राणायाम करण्याची गरज नाही...ज्ञानयोगादि योग करण्याची गरज नाही....ही साधना सर्व साधनांत श्रेष्ठ आहे.... गेल्या वीस वर्षापासुन ही साधना मी अजुनही करीत आहे.... व अंतर्मनाच्या अथांग सागरात डुबकी मारुन मी धन्य होत आहे... मी या साधनेसाठी श्रीराम-जयराम हा मंत्र म्हणतो...श्रीराम शब्द म्हटल्यावर गॅप ठेऊन पुढचा शब्द जयराम म्हणतो... मित्रांनो..... एकदा श्रीराम बोलल्यावर पुढचा जयराम हा कधी येतो ते आठवत नाही.... बऱ्याचदा येतच नाही....त्या मधल्या अवस्थेत दिव्य आनंदात मी मग्न असतो...तो आनंद शब्दातित व अवर्णनिय असा आहे...आताही हे लिहित असतांना माझ्या बाह्यसंज्ञा पुर्णपणे लोपल्या असुन अंतर्मनाच्या प्रवाहात मी डुंबुन गेलो आहे...डोळ्यांवाटे आनंदाश्रु वाहत आहेत व अंगभर सुखद रोमांच प्रगटले आहेत...सारा निसर्गच जणु या अवस्थेचे स्वागत करत आहे.....
मित्रांनो... ही साधना करत असतांना आपण आपला ताबा अंतर्मनाकडे देतो.... त्यावेळी आपली काळजी अंतर्मनच वाहते. आपल्या पोटा-पाण्याची, आपल्या परिवाराची काळजी अंतर्मनच करते... आपल्याला विशेष काही करावे लागत नाही....
कंपनीत एखादी सिस्टिम कॅसकेड मध्ये टाकली की, ती आपोआपच कंट्रोल होत असते... त्यासाठी ऑपरेटरला विशेष काही करावे लागत नाही...
तुकोबाराय महाराज म्हणतात....
जेथे जातो तेथे, तु माझा सांगाती।
चालविशी हाती धरुनिया।।
हाच तो पांडुरंग, हाच तो परब्रह्म, अंतर्मनाच्या रुपाने तुमच्या आमच्या ह्रदयात वास करतो आहे... तोच साऱ्या विश्वात प्राणतत्वाने वास करीत आहे....
आपण जो जो विचार करतो तो आपल्या अंतर्मनात रेकॉर्ड होत असतो..त्यामुळे त्याच विचाराचे आऊटपुट आपल्याला मिळत असते...हे माझ्याने होणार नाही असे म्हणण्याचा अवकाश.... अंतर्मन तुम्हाला तसेच आऊटपुट देऊन ते तुमच्या हातुन कधीच होऊ देणार नाही अशी व्यवस्था करते....किंवा, मला नशापाणी केल्याशिवाय चैन पडत नाही,, त्याशिवाय झोप येत नाही असले विचार केल्यावर अंतर्मन तसेच फळ आपल्याला बहाल करत असते.... अमकी एखादी गोष्ट मी सहजच करुन दाखविन असे विश्वासाने म्हणण्याचा अवकाश..... मग ती गोष्ट कितीही अवघड असो....अंतर्मन ती गोष्ट सहजच करुन दाखवते.... हा अंतर्मनाचा चमत्कार होय.... अण्णा हजारेंनी जे विश्वासाने उपोषण चालवले आहे... त्या साऱ्या गोष्टीत त्यांचे अंतर्मनच त्यांच्या पाठीशी आहे... हा अंतर्मनाचा मोठ्ठा चमत्कार आपण व सारे जग पाहतच आहे...
आपण सतत नकारात्मकच विचार करत आलो आहोत व आपल्या मुलाबाळांनाही आपण असेच नकारात्मक पणेच वागवत आलो आहोत... हे तुझ्या हातुन होणारच नाही... तु अजुन बच्चा आहे.... असले धंदे करुन का तुझे पोट भरणार आहे का.... तु अगदी बावळटच आहे..... गधा आहेस.... तुला अक्कल नाही... उगाच मोठ्य मोठ्या गप्पा मारु नकोस...तुला कवडीचे ज्ञान नाही....उगाच बकवास करु नकोस......मुर्ख कुठला...तुला लायकी नाही.... मोठे झाल्यावर कळेल तुला....मुकाट्याने तुझा अभ्यास कर.... नको तो उपद्व्याप करु नको... त्यात तुला यश येणार नाही.... उगाच मोठेपणाचा आव आणु नकोस.....वगैरे बोलुन आपण आपल्या पाल्यास अगदी नकारात्मक विचारांचा असा नेभळट करुन टाकतो..... त्यांचे अंतर्मन आपण अंकुरीत होण्याच्या अगोदरच कोमजुन टाकतो.... मग त्याला तसेच आऊटपुट मिळाल्यास नवल नाही....
मित्रांनो... असे काही करु नका... मुलांना तेजस्वी व कणखर मनाचे घडवण्यात आपलाच सहभाग असला पाहिजे... कारण आपला पाल्य खुप काळ आपल्या संपर्कात असतो.... त्याला मनाचे समृद्ध व बलवान बनवा... त्याला देशाचे कणखर नागरीक बनवा... त्याचे अंतर्मन बलवान कसे होईल त्याकडे लक्ष्य द्या... आपल्या चिमुकल्याला अंतर्मन जागृतीच्या साधना करायला सांगा....जप तप तीर्थाटण आदिंपेक्षा अंतर्मन कसे जागृत होईल यांकडे लक्ष द्या... त्याच्या हातुन वाईट होणार नाही हे ही आवर्जुन पाहा.... या पेक्षा मी आणखी काय सांगणार... असो... मी ही जी साधना सांगितली आहे, ती अनुभव सिद्ध आहे... प्रत्येकाने करुन पाहा व दुसऱ्यालाही आवर्जुन सांगा.... तुम्हाला काही शंका असतील तर माझ्या मेल वर पाठवा.... अजुनही खुपच प्रभावी साधना आहेत पण तुर्तास ही साधना सांगुन मी तुमचा निरोप घेतो.... व यावरील लिखाण मी थांबवतो.... तुम्हाला या साधने द्वारे खुपच दिव्य अनुभव येवो... व तुमचे कल्याण होवो... मंगल होवो.. अशी मी अंतर्मनाजवळ माझ्या पांडुरंगाजवळ प्रार्थना करतो.. श्रीहरी... श्रीहरी....
माझा मेल आय डी..dsitaram27@yahoo.co.in ( समाप्त )
.......डी सिताराम
साधना...
साधकाने सुखासनात बसावे. दीर्घ श्वास घेऊन तो सोडुन द्यावा. कुंभक वगैरे करु नये. नंतर हळुहळु डोळे बंद करावे. लक्ष्य भ्रुमध्यावर किंवा, टाळुचे ( सहस्रधाराच्या ठिकाणी ) केंद्रित करा.. नंतर तुमच्या आवडत्या देवतेचे मोठ्याने नामस्मरण करा... उच्चार करत असतांना त्या आवाजातील कंप जाणा... नंतर सुमारे तीन चार मिनिटे मोठ्याने नामस्मरण करा... नंतर मात्र दोन नामस्मरणात गॅप ठेवा..पहिले नाम घेतल्यावर थोडे थांबा.....त्या नामाने जी लाट उसळली आहे ती शांत होऊ द्या.. नंतर त्या गॅपवरच लक्ष ठेवा. परत थोड्या वेळाने दुसरे नाम घ्या....अशा प्रकारे दोन नाम मधील गॅप वाढवत चला... व त्या गॅपकडेच अवधान असु द्या. असे करतांना तुम्हाला नकळत गॅप वाढवला गेल्याचा अनुभव येईल.. हिच अवस्था पकडुन ठेवा..कारण ह्या गॅप मधे आपले बाह्यमन हे स्थिर झालेले असते..मन हे एका विषयावरुन उठुन दुसऱ्या विषयांवर जात असतांना जो मधला कालखंड असतो, तेच अंतर्मनाचे स्वरुप होय.. तेच परमात्म्याचे स्वरुप होय.. असो..
दोन नामामधला गॅप वाढवा.. आणखी वाढवा.. उतावळे बनु नका.. विचारांना साक्षी ही राहु नका...आपोआप मन हे निर्विकार होईल... डोळ्यांवर अंमल झोपेचे झापडे येऊ लागेल.....पण झोपु नका... निग्रहाने जागे राहा... पुन्हा नाम घ्या ... गॅप वाढवा... व त्या गॅपकडे पाहा...
हळुहळु मनातील विचार शांत होतील... त्या गॅपमधील स्थिती अनुभवा....यावेळी मन हे सुक्ष्म होऊ लागेल.... भ्रुमध्यभागी किंवा, डोक्यात थोडासा जडपणाचा अनुभव येऊ लागेल...पण तो अल्पकाळच टिकेल... नंतर गोड संवेदना सर्व शरीर भर पसरल्याचा अनुभव येईल...यात अडकु नका...पुन्हा नाम गॅपकडे लक्ष्य ठेवा...गॅप वाढवा...
असे चालु असतांना उठावेसे वाटेल, आळस प्रगट होऊ लागेल...जांभया येऊ लागतील...पायाला रग येईल...भुकेची जाणिव होईल.... असले प्रकार होणे स्वाभाविकच आहे...कारण या साधनेत अल्पकाळ का होईना...बाह्यमनाचा नाश होऊ लागतो...स्वतःचा नाश होणे कोणाला आवडेल.... स्वताःचा नाश होत आहे हे पाहुन बाह्यमनच अशा प्रकारचा अडथळा निर्माण करते...
तुम्ही थांबु नका... पुन्हा नाम घ्या.... व गॅप वाढवा....
मित्रांनो... ही अतिशय दिव्य प्रकारची व प्रभावी साधना आहे. ..तुम्ही जेव्हा या साधनेतुन जागे व्हाल, तेव्हा तुम्हाला अतिशय दिव्य आनंदाचा अनुभव येऊ लागेल.... तुम्हाला या जगताविषयीचे गांभिर्य वाटणार नाही.... तुम्हाला खुपच प्रसन्न वाटु लागेल... आळस वा कंटाळा कोठल्या कोठे पळु गेल्याचा अनुभव येईल.....तुम्हाला खरे तर या साधनेतुन उठावेसेच वाटणार नाही... असे होणे म्हणजेच ही साधना योग्य मार्गाने होत असल्याचे गमक आहे....
या साधनेत जप....तप....प्राणायाम करण्याची गरज नाही...ज्ञानयोगादि योग करण्याची गरज नाही....ही साधना सर्व साधनांत श्रेष्ठ आहे.... गेल्या वीस वर्षापासुन ही साधना मी अजुनही करीत आहे.... व अंतर्मनाच्या अथांग सागरात डुबकी मारुन मी धन्य होत आहे... मी या साधनेसाठी श्रीराम-जयराम हा मंत्र म्हणतो...श्रीराम शब्द म्हटल्यावर गॅप ठेऊन पुढचा शब्द जयराम म्हणतो... मित्रांनो..... एकदा श्रीराम बोलल्यावर पुढचा जयराम हा कधी येतो ते आठवत नाही.... बऱ्याचदा येतच नाही....त्या मधल्या अवस्थेत दिव्य आनंदात मी मग्न असतो...तो आनंद शब्दातित व अवर्णनिय असा आहे...आताही हे लिहित असतांना माझ्या बाह्यसंज्ञा पुर्णपणे लोपल्या असुन अंतर्मनाच्या प्रवाहात मी डुंबुन गेलो आहे...डोळ्यांवाटे आनंदाश्रु वाहत आहेत व अंगभर सुखद रोमांच प्रगटले आहेत...सारा निसर्गच जणु या अवस्थेचे स्वागत करत आहे.....
मित्रांनो... ही साधना करत असतांना आपण आपला ताबा अंतर्मनाकडे देतो.... त्यावेळी आपली काळजी अंतर्मनच वाहते. आपल्या पोटा-पाण्याची, आपल्या परिवाराची काळजी अंतर्मनच करते... आपल्याला विशेष काही करावे लागत नाही....
कंपनीत एखादी सिस्टिम कॅसकेड मध्ये टाकली की, ती आपोआपच कंट्रोल होत असते... त्यासाठी ऑपरेटरला विशेष काही करावे लागत नाही...
तुकोबाराय महाराज म्हणतात....
जेथे जातो तेथे, तु माझा सांगाती।
चालविशी हाती धरुनिया।।
हाच तो पांडुरंग, हाच तो परब्रह्म, अंतर्मनाच्या रुपाने तुमच्या आमच्या ह्रदयात वास करतो आहे... तोच साऱ्या विश्वात प्राणतत्वाने वास करीत आहे....
आपण जो जो विचार करतो तो आपल्या अंतर्मनात रेकॉर्ड होत असतो..त्यामुळे त्याच विचाराचे आऊटपुट आपल्याला मिळत असते...हे माझ्याने होणार नाही असे म्हणण्याचा अवकाश.... अंतर्मन तुम्हाला तसेच आऊटपुट देऊन ते तुमच्या हातुन कधीच होऊ देणार नाही अशी व्यवस्था करते....किंवा, मला नशापाणी केल्याशिवाय चैन पडत नाही,, त्याशिवाय झोप येत नाही असले विचार केल्यावर अंतर्मन तसेच फळ आपल्याला बहाल करत असते.... अमकी एखादी गोष्ट मी सहजच करुन दाखविन असे विश्वासाने म्हणण्याचा अवकाश..... मग ती गोष्ट कितीही अवघड असो....अंतर्मन ती गोष्ट सहजच करुन दाखवते.... हा अंतर्मनाचा चमत्कार होय.... अण्णा हजारेंनी जे विश्वासाने उपोषण चालवले आहे... त्या साऱ्या गोष्टीत त्यांचे अंतर्मनच त्यांच्या पाठीशी आहे... हा अंतर्मनाचा मोठ्ठा चमत्कार आपण व सारे जग पाहतच आहे...
आपण सतत नकारात्मकच विचार करत आलो आहोत व आपल्या मुलाबाळांनाही आपण असेच नकारात्मक पणेच वागवत आलो आहोत... हे तुझ्या हातुन होणारच नाही... तु अजुन बच्चा आहे.... असले धंदे करुन का तुझे पोट भरणार आहे का.... तु अगदी बावळटच आहे..... गधा आहेस.... तुला अक्कल नाही... उगाच मोठ्य मोठ्या गप्पा मारु नकोस...तुला कवडीचे ज्ञान नाही....उगाच बकवास करु नकोस......मुर्ख कुठला...तुला लायकी नाही.... मोठे झाल्यावर कळेल तुला....मुकाट्याने तुझा अभ्यास कर.... नको तो उपद्व्याप करु नको... त्यात तुला यश येणार नाही.... उगाच मोठेपणाचा आव आणु नकोस.....वगैरे बोलुन आपण आपल्या पाल्यास अगदी नकारात्मक विचारांचा असा नेभळट करुन टाकतो..... त्यांचे अंतर्मन आपण अंकुरीत होण्याच्या अगोदरच कोमजुन टाकतो.... मग त्याला तसेच आऊटपुट मिळाल्यास नवल नाही....
मित्रांनो... असे काही करु नका... मुलांना तेजस्वी व कणखर मनाचे घडवण्यात आपलाच सहभाग असला पाहिजे... कारण आपला पाल्य खुप काळ आपल्या संपर्कात असतो.... त्याला मनाचे समृद्ध व बलवान बनवा... त्याला देशाचे कणखर नागरीक बनवा... त्याचे अंतर्मन बलवान कसे होईल त्याकडे लक्ष्य द्या... आपल्या चिमुकल्याला अंतर्मन जागृतीच्या साधना करायला सांगा....जप तप तीर्थाटण आदिंपेक्षा अंतर्मन कसे जागृत होईल यांकडे लक्ष द्या... त्याच्या हातुन वाईट होणार नाही हे ही आवर्जुन पाहा.... या पेक्षा मी आणखी काय सांगणार... असो... मी ही जी साधना सांगितली आहे, ती अनुभव सिद्ध आहे... प्रत्येकाने करुन पाहा व दुसऱ्यालाही आवर्जुन सांगा.... तुम्हाला काही शंका असतील तर माझ्या मेल वर पाठवा.... अजुनही खुपच प्रभावी साधना आहेत पण तुर्तास ही साधना सांगुन मी तुमचा निरोप घेतो.... व यावरील लिखाण मी थांबवतो.... तुम्हाला या साधने द्वारे खुपच दिव्य अनुभव येवो... व तुमचे कल्याण होवो... मंगल होवो.. अशी मी अंतर्मनाजवळ माझ्या पांडुरंगाजवळ प्रार्थना करतो.. श्रीहरी... श्रीहरी....
माझा मेल आय डी..dsitaram27@yahoo.co.in ( समाप्त )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा