शुक्रवार, ११ मार्च, २०११

बा मना

बा मानवा! इंद्रियांच्या मागे लागु नकोस, भल्याभल्यांना या इंद्रियांनी भुईसपाट केले आहे. वासना, मग ती कोणतीही असो, ती अत्यंत अनिवार असते. विरक्त म्हणवणाऱ्यांनाही या वासनेने सोडले नाही. तेथे तुमच्या आमच्या सारख्यांची काय कथा? वासनेचे बीज जोवर चित्तात आहे, तोवर खरा साक्षात्कार दुर्लभच. वासना क्षीण करण्यासाठी मनाला नामस्मरणात गुंतवुन ठेवणे हाच नाममात्र उपाय आहे. नामस्मरणाने मन निर्विकार होऊ लागते, व जीवास अढळ अशी स्वरुपस्थिती प्राप्त होते. म्हणुन बा मना, कोणत्याही परिस्थितीत नामस्मरण सोडू नको.
.....डी सिताराम

ऐलतीर पैलतीर

ऐलतीरी संसार हा पैलतीरी काळ
कळुनिया सारे तरी करी वळवळ
माझे माझे म्हणुनिया, जोडी धनगोत
बुडूनिया स्वये जाई, करी वाताहत
पाप-पुण्य नाही मानी, अधर्माशी संग
बाह्यात्कारी भुललाशी, होई जीव दंग

ऐलतीरी संसार हा पैलतीरी काळ
कळुनिया सारे तरी करी वळवळ ।।

अहंकार सोबतीला, घेई मानपान
तुच्छ लेखे इतरांशी, पोशी अभिमान
जागा होई बारे गड्या, आवर हा खेळ
तुजलागी भक्षण्याशी, सिद्ध आहे काळ

ऐलतीरी संसार हा पैलतीरी काळ
कळुनिया सारे तरी करी वळवळ।।

.......डी सिताराम