बा मानवा! इंद्रियांच्या मागे लागु नकोस, भल्याभल्यांना या इंद्रियांनी भुईसपाट केले आहे. वासना, मग ती कोणतीही असो, ती अत्यंत अनिवार असते. विरक्त म्हणवणाऱ्यांनाही या वासनेने सोडले नाही. तेथे तुमच्या आमच्या सारख्यांची काय कथा? वासनेचे बीज जोवर चित्तात आहे, तोवर खरा साक्षात्कार दुर्लभच. वासना क्षीण करण्यासाठी मनाला नामस्मरणात गुंतवुन ठेवणे हाच नाममात्र उपाय आहे. नामस्मरणाने मन निर्विकार होऊ लागते, व जीवास अढळ अशी स्वरुपस्थिती प्राप्त होते. म्हणुन बा मना, कोणत्याही परिस्थितीत नामस्मरण सोडू नको.
.....डी सिताराम
.....डी सिताराम