1. कर्मत्यागी गृहस्थः- जो गृहस्थ धर्मात राहुन त्यास प्राप्त झालेले कर्म न करता फक्त कालापव्यय करत असेल,
2. व्रतत्यागी ब्रह्मचारीः- जो ब्रह्मचारी असेल, पण ब्रह्मचर्य व्रताचा पालन करत नसेल तर त्याचे ते ढोंगच होय.
3. गावात रहाणारा तपस्वीः- तपस्वी म्हणजे वानप्रस्थात प्रवेश केलेला. असा जो कोणी असेल त्याने गावात राहु नये. जनसंपर्कापासुन दुर रहावे. पण जो गावातच राहुन लोकांच्या संसारात लुडबुड करत असेल तर ते त्याचे ढोंगच होईल.
4. इंद्रियलोलुप संन्यासीः- हल्लीचे बाबा स्वतःला संन्यासी, योगी, अवतारी म्हणवुन घेतात व वासनेच्या अधिन राहुन समाज कार्याचा आव आणतात, कोट्यवधी रुपयांची माया जमवतात. अबलांवर बलात्कार करतात. आव संन्यासाचा पण कर्म मात्र अश्लिलतेचे, अशा बाबा महाराजांना कोणते नाव द्यावे तेच कळत नाही. समाज मात्र यांकडे कसा ओढला जातो, हे मात्र गुढ आहे. बाबांच्या शिष्य संप्रदायात भगिनी वर्गच जास्त आढळुन येतो. हा प्रकार भयावह आहे. समाज मानसिक रोगाने पछाडला जात आहे, हे मात्र खरे आहे. असे ढोंगी बाबा म्हणजे आपल्या समाज व्यवस्थेला लागलेली किडच आहे. ही कीड वेळीच ठेचली नाही तर मात्र आपले काही खरे नाही.
हे चारही आश्रमव्यवस्थेचे कलंक आहेत, आणि व्यर्थ आश्रम आचरणाचा देखावा करणारे मुर्ख आहेत. समाजाने या चारही मुर्खांना हद्दपार केले पाहिजे.
................. डी सिताराम
2. व्रतत्यागी ब्रह्मचारीः- जो ब्रह्मचारी असेल, पण ब्रह्मचर्य व्रताचा पालन करत नसेल तर त्याचे ते ढोंगच होय.
3. गावात रहाणारा तपस्वीः- तपस्वी म्हणजे वानप्रस्थात प्रवेश केलेला. असा जो कोणी असेल त्याने गावात राहु नये. जनसंपर्कापासुन दुर रहावे. पण जो गावातच राहुन लोकांच्या संसारात लुडबुड करत असेल तर ते त्याचे ढोंगच होईल.
4. इंद्रियलोलुप संन्यासीः- हल्लीचे बाबा स्वतःला संन्यासी, योगी, अवतारी म्हणवुन घेतात व वासनेच्या अधिन राहुन समाज कार्याचा आव आणतात, कोट्यवधी रुपयांची माया जमवतात. अबलांवर बलात्कार करतात. आव संन्यासाचा पण कर्म मात्र अश्लिलतेचे, अशा बाबा महाराजांना कोणते नाव द्यावे तेच कळत नाही. समाज मात्र यांकडे कसा ओढला जातो, हे मात्र गुढ आहे. बाबांच्या शिष्य संप्रदायात भगिनी वर्गच जास्त आढळुन येतो. हा प्रकार भयावह आहे. समाज मानसिक रोगाने पछाडला जात आहे, हे मात्र खरे आहे. असे ढोंगी बाबा म्हणजे आपल्या समाज व्यवस्थेला लागलेली किडच आहे. ही कीड वेळीच ठेचली नाही तर मात्र आपले काही खरे नाही.
हे चारही आश्रमव्यवस्थेचे कलंक आहेत, आणि व्यर्थ आश्रम आचरणाचा देखावा करणारे मुर्ख आहेत. समाजाने या चारही मुर्खांना हद्दपार केले पाहिजे.
................. डी सिताराम