अंतर्मनाच्या जागृतीची अवस्था आपल्याला निरंजनपदाकडे घेऊन जाते. कारण यात जगताचे प्रतिबिंब नसते.. जगद्भ्रम नसतो... जगातील विकार नसतात....जगताचे प्रतिबिंब हे बाह्यमनात भासते.. त्यानुसार आपण जगात व्यवहार करत असतो.. भय, द्वेष, काम, क्रोध, लोभ आदि विकार हे बाह्यमनातच भसत असतात.. मित्रांनो.. हा विषय समजण्यास जरा कठिण आहे.. पण तो सोपा करुन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अंतर्मनाचे ज्ञान मिळवायचे.. ज्ञानाने अज्ञान निवृत्त करायचे व नंतर ज्ञानाचाही त्याग करायचा.. नाम घेता घेता आपण नामातित व्हायला पाहिजे... स्वतःला नामात विलिन करता यायला पाहिजे.. तिच अंतर्मनाची जागृती व तोच आत्मसाक्षात्कार..
नाथांच्या घरची उलटी खुण ही तिच आहे.. सद्गुरुंनी दिलेले नाम जपता जपता आपणच सद्गुरुंना गिळुन सद्गुरुपदी आरुढ व्हायला पाहिजे.. नंतर त्या पदाचाही त्याग केला पाहिजे.. हाच तो अंतर्मन जागृतीचा प्रवास.....मी जास्त भक्तियोगाबद्दल लिहिणार नाही.. कारण तो स्वतंत्र विषय आहे... त्याबद्दल मी कधीतरी लिहिनच... असो.. याठिकाणी त्याचा उल्लेख करण्याचे कारण की, अंतर्मन हे भक्तियोगाने कशा प्रकारे जागृत होते.. हे माझ्या मित्रांना सांगायचे होते... कारण स्वतःला ईश्वराचा महान भक्त म्हणवणारे देखील मायेत अडकततात व विषयसुखाच्या मागे लागुन कपाळमोक्ष करुन घेतात... आपल्याला असा वरकरणी देखावा नको.. त्यासाठी दर आषाढी कार्तिकीला पंढरपुरी जाणे नको.. व्रत वैकल्य, जप तप करणे नको... कष्टसाध्य हटयोग नको... वा प्राणायामादि अवघड क्रिया देखील नको.. कारण यांसाठी सद्गुरुंच्या संगतीची गरज असते.. हल्लीच्या फसवेगीरीच्या कालखंडात खरे सद्गुरु शोधुन काढणे अवघड असते... हा विषय एकदा का समजला म्हणजे आपल्या मनाची तयारी होईल.... व आपल्याला नक्की काय व कशासाठी करायचे याचा बोध पक्का होईल...
माझा एक मित्र आहे.. धार्मिक मनाचा, नियमित जप तप करणारा.. वारी करणारा.. असा.. पण तो नेहमी दुःखी कष्टी व उदास असायचा... त्याचे कारण त्याला विचारले असता... तो म्हणाला की, भगवंताचे मी इतके करतो पण त्याने मला कधीच चांगले दिवस दाखवले नाही.. पैसा हातात दिला नाही...त्याच्या दृष्टीने ईश्वराची उपासना ही केवळ ऐहिक उपभोगासाठी करायची... म्हणजे याचा अर्थ त्याला ईश्वर समजला नव्हता... व त्याच्या मनात असलेल्या अंतर्मनाच्या प्रचंड सामर्थ्याची त्याला जाणिव नव्हती.. नंतर त्याला मी ईश्वर प्रणिधानाची व अंतर्मन जागृतीची दीक्षा दिली.. यात माझा मोठेपणा बिलकुल नाही... मी कोणी साधुपुरुष देखील नाही.. हे माझ्या मित्रांना मी आताच सांगुन ठेवतो...असो.. यानंतर माझा तो मित्र शांत झाला.. त्याचे मन भरकटण्याचे थांबले... व तो ऐहिक दृष्टीने व पारमार्थिक दृष्टीने सुखी आहे.. तो म्हणतो की आज खरा ईश्वराचा अर्थ कळला आहे... इतके दिवस नुसता शब्दज्ञानी बनलो होतो... शब्दांचा खेळ...
मित्रांनो.. अंतर्मन जागृतीसाठी आपल्याला एका गोष्टीची सतत जाणिव ठेवायला पाहिजे, ती ही की, आपल्या मनातील पाच विकारांचा लय व्हायला पाहिजे. ते विकार म्हणजे.... संकल्प- विकल्प, मन, बुद्धि, चित्त, अहंकार, हा विषय चांगला समजण्यासाठी मी आपल्याला सर्वांच्या परिचयाचे उदाहरण सांगतो... मी ऑफिस मधुन दमुन थकुन घरी येतो. त्यावेळी मला गरमा गरम चहा घ्यावसा वाटतो.. माझ्या साऱ्या चित्तवृत्ती या चहाकडे लागलेल्या असतात. माझे मन चहाच्या संकल्पात रममाण होते.. कान स्वयंपाक घरातील आवाजाचा वेध घेऊ लागतात... माझी वृत्ती ही कानाच्या रुपाने स्वयंपाक घरात धाव घेते.. स्वयंपाक घरातुन चहा ठेवण्याचा आवाज येतो.. साखरेच्या डब्याचा व चहाच्या डब्याचा आवाज ऐकल्यावर माझी पक्की खात्री होते की चहा ठेवला गेला आहे... त्यामुळे माझे संकल्प विकल्प शांत होतात..... मनाची स्वयंपाक घरातील आवाजाकडे लक्ष देण्याची वृत्ती शांत झाली.. नंतर तो चहा थोड्या वेळाने प्रत्यक्ष हातात येतो त्यावेळी माझी बुद्धी शांत होते... व चहा घेतल्यावर मात्र माझा अहंकार देखील शांत होतो... व मला चहा प्यायल्यावर सुख वाटते मित्रांनो... आता विचार करा की माझे सुख चहाच्या कपबशीत आहे का.... नाही... कारण तसे असते तर मी दररोज चहा पितो.. तर मी सुखी व्हायला पाहिजे.. पण तसे होत नाही... कारण माझ्या चंचल चित्तवृत्ती जेव्हा शांत होतात त्याच वेळेस मला खरे सुख मिळते... हीच गोष्ट विषयसुखाबाबत समजावी.... चहाचे एक सौम्य उदाहरण दिले आहे....या चंचल वृत्ती जेव्हा शांत होतात त्यावेळी माझ्या बहिर्मनास अंतर्मनाचा स्पर्श झालेला असतो... आता असे अंतर्मन आपल्याला हवे त्या वेळेला जागृत करता आले तर...अर्थात् कोणाचीही मदत न घेता.. काय मजा येईल नाही का... खुपच मजेचा विषय आहे हा....
आणखी एक उदाहरण... जेव्हा आपल्याला गाढ- प्रगाढ अशी झोप लागते त्यावेळी आपले मनातील सर्व विषय चित्तात लय पावतात. त्यावेळी चित्त व अहंकार देखील लयास जातो...कारण या वेळी मी कोणी मोठा माणुस नसतो.. साहेब नसतो.. अशा गाढ झोपेत पुरुष पुरुष नसतो, स्री ही स्री नसते, सन्याशी संन्याशी नसतो, ब्रह्मचारी ब्रह्मचारी नसतो... कारण की गाढ झोपेत एकही विषय नसतो... गाढ झोपेत संकल्प विकल्प थांबले आहेत, चित्ताचा वेध घेण्याचे थांबले आहे, बुद्धिचा विचार करण्याचे थांबले आहे.... त्यावेळी अहंकारही आपोआपच लयाला जातो...झोपेतुन उठल्यावर किती ताजेतवाने वाटते.....याचा अर्थ असा होतो की, समोर एकही विषय नसतांना खरे सुख मिळते... .याचाच अर्थ असा की, विषयांत सुख नसते... ते असते सुखाचे प्रतिबिंब... एक मृगजळ....ज्याचे अंतर्मन साधनेने जागृत झाले आहे, तो साधक अशा सुखासाठी त्याला सुखाच्या प्रतिबिंबाकडे धावण्याची गरजच नसते... ( क्रमशः )
.....डी सिताराम
नाथांच्या घरची उलटी खुण ही तिच आहे.. सद्गुरुंनी दिलेले नाम जपता जपता आपणच सद्गुरुंना गिळुन सद्गुरुपदी आरुढ व्हायला पाहिजे.. नंतर त्या पदाचाही त्याग केला पाहिजे.. हाच तो अंतर्मन जागृतीचा प्रवास.....मी जास्त भक्तियोगाबद्दल लिहिणार नाही.. कारण तो स्वतंत्र विषय आहे... त्याबद्दल मी कधीतरी लिहिनच... असो.. याठिकाणी त्याचा उल्लेख करण्याचे कारण की, अंतर्मन हे भक्तियोगाने कशा प्रकारे जागृत होते.. हे माझ्या मित्रांना सांगायचे होते... कारण स्वतःला ईश्वराचा महान भक्त म्हणवणारे देखील मायेत अडकततात व विषयसुखाच्या मागे लागुन कपाळमोक्ष करुन घेतात... आपल्याला असा वरकरणी देखावा नको.. त्यासाठी दर आषाढी कार्तिकीला पंढरपुरी जाणे नको.. व्रत वैकल्य, जप तप करणे नको... कष्टसाध्य हटयोग नको... वा प्राणायामादि अवघड क्रिया देखील नको.. कारण यांसाठी सद्गुरुंच्या संगतीची गरज असते.. हल्लीच्या फसवेगीरीच्या कालखंडात खरे सद्गुरु शोधुन काढणे अवघड असते... हा विषय एकदा का समजला म्हणजे आपल्या मनाची तयारी होईल.... व आपल्याला नक्की काय व कशासाठी करायचे याचा बोध पक्का होईल...
माझा एक मित्र आहे.. धार्मिक मनाचा, नियमित जप तप करणारा.. वारी करणारा.. असा.. पण तो नेहमी दुःखी कष्टी व उदास असायचा... त्याचे कारण त्याला विचारले असता... तो म्हणाला की, भगवंताचे मी इतके करतो पण त्याने मला कधीच चांगले दिवस दाखवले नाही.. पैसा हातात दिला नाही...त्याच्या दृष्टीने ईश्वराची उपासना ही केवळ ऐहिक उपभोगासाठी करायची... म्हणजे याचा अर्थ त्याला ईश्वर समजला नव्हता... व त्याच्या मनात असलेल्या अंतर्मनाच्या प्रचंड सामर्थ्याची त्याला जाणिव नव्हती.. नंतर त्याला मी ईश्वर प्रणिधानाची व अंतर्मन जागृतीची दीक्षा दिली.. यात माझा मोठेपणा बिलकुल नाही... मी कोणी साधुपुरुष देखील नाही.. हे माझ्या मित्रांना मी आताच सांगुन ठेवतो...असो.. यानंतर माझा तो मित्र शांत झाला.. त्याचे मन भरकटण्याचे थांबले... व तो ऐहिक दृष्टीने व पारमार्थिक दृष्टीने सुखी आहे.. तो म्हणतो की आज खरा ईश्वराचा अर्थ कळला आहे... इतके दिवस नुसता शब्दज्ञानी बनलो होतो... शब्दांचा खेळ...
मित्रांनो.. अंतर्मन जागृतीसाठी आपल्याला एका गोष्टीची सतत जाणिव ठेवायला पाहिजे, ती ही की, आपल्या मनातील पाच विकारांचा लय व्हायला पाहिजे. ते विकार म्हणजे.... संकल्प- विकल्प, मन, बुद्धि, चित्त, अहंकार, हा विषय चांगला समजण्यासाठी मी आपल्याला सर्वांच्या परिचयाचे उदाहरण सांगतो... मी ऑफिस मधुन दमुन थकुन घरी येतो. त्यावेळी मला गरमा गरम चहा घ्यावसा वाटतो.. माझ्या साऱ्या चित्तवृत्ती या चहाकडे लागलेल्या असतात. माझे मन चहाच्या संकल्पात रममाण होते.. कान स्वयंपाक घरातील आवाजाचा वेध घेऊ लागतात... माझी वृत्ती ही कानाच्या रुपाने स्वयंपाक घरात धाव घेते.. स्वयंपाक घरातुन चहा ठेवण्याचा आवाज येतो.. साखरेच्या डब्याचा व चहाच्या डब्याचा आवाज ऐकल्यावर माझी पक्की खात्री होते की चहा ठेवला गेला आहे... त्यामुळे माझे संकल्प विकल्प शांत होतात..... मनाची स्वयंपाक घरातील आवाजाकडे लक्ष देण्याची वृत्ती शांत झाली.. नंतर तो चहा थोड्या वेळाने प्रत्यक्ष हातात येतो त्यावेळी माझी बुद्धी शांत होते... व चहा घेतल्यावर मात्र माझा अहंकार देखील शांत होतो... व मला चहा प्यायल्यावर सुख वाटते मित्रांनो... आता विचार करा की माझे सुख चहाच्या कपबशीत आहे का.... नाही... कारण तसे असते तर मी दररोज चहा पितो.. तर मी सुखी व्हायला पाहिजे.. पण तसे होत नाही... कारण माझ्या चंचल चित्तवृत्ती जेव्हा शांत होतात त्याच वेळेस मला खरे सुख मिळते... हीच गोष्ट विषयसुखाबाबत समजावी.... चहाचे एक सौम्य उदाहरण दिले आहे....या चंचल वृत्ती जेव्हा शांत होतात त्यावेळी माझ्या बहिर्मनास अंतर्मनाचा स्पर्श झालेला असतो... आता असे अंतर्मन आपल्याला हवे त्या वेळेला जागृत करता आले तर...अर्थात् कोणाचीही मदत न घेता.. काय मजा येईल नाही का... खुपच मजेचा विषय आहे हा....
आणखी एक उदाहरण... जेव्हा आपल्याला गाढ- प्रगाढ अशी झोप लागते त्यावेळी आपले मनातील सर्व विषय चित्तात लय पावतात. त्यावेळी चित्त व अहंकार देखील लयास जातो...कारण या वेळी मी कोणी मोठा माणुस नसतो.. साहेब नसतो.. अशा गाढ झोपेत पुरुष पुरुष नसतो, स्री ही स्री नसते, सन्याशी संन्याशी नसतो, ब्रह्मचारी ब्रह्मचारी नसतो... कारण की गाढ झोपेत एकही विषय नसतो... गाढ झोपेत संकल्प विकल्प थांबले आहेत, चित्ताचा वेध घेण्याचे थांबले आहे, बुद्धिचा विचार करण्याचे थांबले आहे.... त्यावेळी अहंकारही आपोआपच लयाला जातो...झोपेतुन उठल्यावर किती ताजेतवाने वाटते.....याचा अर्थ असा होतो की, समोर एकही विषय नसतांना खरे सुख मिळते... .याचाच अर्थ असा की, विषयांत सुख नसते... ते असते सुखाचे प्रतिबिंब... एक मृगजळ....ज्याचे अंतर्मन साधनेने जागृत झाले आहे, तो साधक अशा सुखासाठी त्याला सुखाच्या प्रतिबिंबाकडे धावण्याची गरजच नसते... ( क्रमशः )
.....डी सिताराम