8शिष्यास अनुग्रह दिल्यावर सद्गुरु शिष्यांची वेळोवेळी चौकशी करतात. त्यांच्यात नामाबद्दल गोडी उत्पन्न करतात. नाम दिल्यानंतर जो अनुभव येतो त्या अनुभवाच्या वरच्या अवस्थेत नेण्यास शिष्यांस उत्तेजन देतात. शिष्यांची खरोखर उन्नती होते आहे की नाही, यावर त्यांचा भारी कटाक्ष असतो.
8खरे सद्गुरु हे शिष्यांस भक्तियोग, ज्ञानयोग व कर्मयोगाची सांगड कशी घालावी हे शिकवतात. तसेच त्यांना स्वधर्म समजाऊन सांगतात.
8खरे सद्गुरु हे शिष्यांना अंधश्रद्धेपासुन दूर ठेवतात.
8खरे सद्गुरु शिष्यांस ज्ञान देऊन प्रबोध देतात व त्यांना विश्वस्वप्नातुन जागे करतात. आत्मदर्शन घडवुन आणतात.
8खरा शिष्य गुरुंनी दिलेले नाम मोठ्या श्रद्धेने घेतो.
8खरा शिष्य हा गुरुंचा आदर करतो व मनात आलेले सर्व संशय गुरुंजवळ मनमोकळेपणाने सांगुन शंका निरसन करुन घेतो.
8खरा शिष्य हा गुरुंनी सांगितलेल्या ज्ञानाचे चिंतन करुन प्रयत्नाने ज्ञानात भर घालतो. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, योगवाशिष्ठ, दासबोध, उपनिषदे व महाभारत यांसारख्या पवित्र ग्रंथाचे नियमित वाचन व मनन करतो.
8प्राप्त झालेला अनुभव गुरु किंवा अधिकारी व्यक्तिंखेरीज कोणाला सांगु नये.
8बद्धतेकडुन मोक्षाकडे, सगुणत्वाकडुन निर्गुणत्वाकडे वाटचाल करायची असल्यामुळे शिष्याने नामसाधना अत्यंत सुक्ष्मत्वाने करावी. तसेच गुरुंच्या देहाकडे न पाहता गुरुंचे विश्वव्यापक रुपाकडे लक्ष ठेऊन ज्ञानसाधना चालु ठेवावी.
8एकवेळ गुरुंचा विसर पडला तरी चालेल पण त्यांनी जी साधना व जे नाम दिलेले आहे कोठल्याही परिस्थितीत सोडु नये.
8गुरुंची महती एकदा समजल्यावर त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवा व त्यांच्या कार्यास हातभार लावावा. त्यांचे विचार तळागाळातील सर्वस्तरीय बांधवांपर्यंत पोचविण्याचे पवित्र कार्य करा.
8नवा व बलवान भारत घडवा.
8संतांच्या चमत्कारांकडे लाक्षणिक अर्थाने पाहा. त्या चमत्कारात गुंग होऊ नका,
8स्वतः स्वधर्म आचरुन दाखवा तसेच दुसऱ्यांनाही आचरण्यास सांगा.
8कोणावरही अन्याय करु नका व कोणाचाही अन्याय सहन करु नका तसेच अहिंसेचा अतिरेक करु नका.
8प्राचिन काळातील ऋषी-मुनींच्या तत्वज्ञानाचा अर्थ वैज्ञानिक दृष्टीकोनातुन समजुन घ्या व तसे वागण्याचा प्रयत्न करा.
8अंधश्रद्धा मनी कवटाळुन ठेऊ नका. डोळस व्हा.
8स्रियांना मान देण्यास शिका. ज्या घरात वा ज्या देशात स्रियांना योग्य मान दिला जातो, तेथे स्वधर्म, नीति, संपत्ती व खरा परमार्थ वास करीत असतो हे लक्षात ठेवा.
8जेथे स्रियांना उपभोग्य वस्तु म्हणुन बघितले जाते तेथे अज्ञान, अविद्या, अधर्म व अवदसा वास करतात. असा विकारी जनांचा अधःपात हा ठरलेलाच असतो. असा व्यक्ति कधीच सुखी नसतात हे लक्षात ठेवावे.
8सवड काढुन पंढरपुर, आळंदी, शिर्डी, गाणगापुर यासारखी पवित्र तीर्थयात्रा करा. आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करु नका. साधा व भोळा भावच ईश्वराला आवडतो.
8थोर पुरुषांची भेटीगाठी घ्या. त्यांचा आशीर्वाद घ्या. संतांची अभंगे पाठ करा.
8रंजल्या गांजल्यात ईश्वर पहा. समाजातील तळागाळातील बंधुंची जमेल तितकी निस्वार्थी भावनेने सेवा करावी.
8खरा साधू ओळखुन त्याची भक्तिभावाने पूजा करावी. तसेच शत्रु ओळखुन त्याला वेळीच ठेचण्याचे वा प्रतिकार करण्याचे धारिष्ठ दाखवावे. दास्यत्व ईश्वराचे स्विकारावे. स्वतःच्या स्वार्थासाठी उठसुठ कोणाचे पाय धरु नये.
8खरे सद्गुरु हे शिष्यांस भक्तियोग, ज्ञानयोग व कर्मयोगाची सांगड कशी घालावी हे शिकवतात. तसेच त्यांना स्वधर्म समजाऊन सांगतात.
8खरे सद्गुरु हे शिष्यांना अंधश्रद्धेपासुन दूर ठेवतात.
8खरे सद्गुरु शिष्यांस ज्ञान देऊन प्रबोध देतात व त्यांना विश्वस्वप्नातुन जागे करतात. आत्मदर्शन घडवुन आणतात.
8खरा शिष्य गुरुंनी दिलेले नाम मोठ्या श्रद्धेने घेतो.
8खरा शिष्य हा गुरुंचा आदर करतो व मनात आलेले सर्व संशय गुरुंजवळ मनमोकळेपणाने सांगुन शंका निरसन करुन घेतो.
8खरा शिष्य हा गुरुंनी सांगितलेल्या ज्ञानाचे चिंतन करुन प्रयत्नाने ज्ञानात भर घालतो. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, योगवाशिष्ठ, दासबोध, उपनिषदे व महाभारत यांसारख्या पवित्र ग्रंथाचे नियमित वाचन व मनन करतो.
8प्राप्त झालेला अनुभव गुरु किंवा अधिकारी व्यक्तिंखेरीज कोणाला सांगु नये.
8बद्धतेकडुन मोक्षाकडे, सगुणत्वाकडुन निर्गुणत्वाकडे वाटचाल करायची असल्यामुळे शिष्याने नामसाधना अत्यंत सुक्ष्मत्वाने करावी. तसेच गुरुंच्या देहाकडे न पाहता गुरुंचे विश्वव्यापक रुपाकडे लक्ष ठेऊन ज्ञानसाधना चालु ठेवावी.
8एकवेळ गुरुंचा विसर पडला तरी चालेल पण त्यांनी जी साधना व जे नाम दिलेले आहे कोठल्याही परिस्थितीत सोडु नये.
8गुरुंची महती एकदा समजल्यावर त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवा व त्यांच्या कार्यास हातभार लावावा. त्यांचे विचार तळागाळातील सर्वस्तरीय बांधवांपर्यंत पोचविण्याचे पवित्र कार्य करा.
8नवा व बलवान भारत घडवा.
8संतांच्या चमत्कारांकडे लाक्षणिक अर्थाने पाहा. त्या चमत्कारात गुंग होऊ नका,
8स्वतः स्वधर्म आचरुन दाखवा तसेच दुसऱ्यांनाही आचरण्यास सांगा.
8कोणावरही अन्याय करु नका व कोणाचाही अन्याय सहन करु नका तसेच अहिंसेचा अतिरेक करु नका.
8प्राचिन काळातील ऋषी-मुनींच्या तत्वज्ञानाचा अर्थ वैज्ञानिक दृष्टीकोनातुन समजुन घ्या व तसे वागण्याचा प्रयत्न करा.
8अंधश्रद्धा मनी कवटाळुन ठेऊ नका. डोळस व्हा.
8स्रियांना मान देण्यास शिका. ज्या घरात वा ज्या देशात स्रियांना योग्य मान दिला जातो, तेथे स्वधर्म, नीति, संपत्ती व खरा परमार्थ वास करीत असतो हे लक्षात ठेवा.
8जेथे स्रियांना उपभोग्य वस्तु म्हणुन बघितले जाते तेथे अज्ञान, अविद्या, अधर्म व अवदसा वास करतात. असा विकारी जनांचा अधःपात हा ठरलेलाच असतो. असा व्यक्ति कधीच सुखी नसतात हे लक्षात ठेवावे.
8सवड काढुन पंढरपुर, आळंदी, शिर्डी, गाणगापुर यासारखी पवित्र तीर्थयात्रा करा. आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करु नका. साधा व भोळा भावच ईश्वराला आवडतो.
8थोर पुरुषांची भेटीगाठी घ्या. त्यांचा आशीर्वाद घ्या. संतांची अभंगे पाठ करा.
8एकादशी नियमित करा. जमेंल तर आरत्या, हरिपाठ नियमित म्हणण्याचा परिपाठ चालु करा. नियमांचे पालन करा. नियम अंगी बाणा. लहान मुलांना शुभ संस्कार देऊन घडवा.
8घर अंगण परिसर स्वच्छ ठेवा.
8दारु, तंबाखु, मद्यपान, मांसाहार, परद्रव्य व परदारा यांपासुन दूर राहा. कोठलेही व्यसन करु नका.
8दारु, तंबाखु, मद्यपान, मांसाहार, परद्रव्य व परदारा यांपासुन दूर राहा. कोठलेही व्यसन करु नका.
8दुसऱ्या बांधवांनाही अध्यात्माचा मार्ग दाखवा. त्यांनाही अनुग्रह घ्यायला सांगुन परमार्थावर वाटचाल करायला सांगा.
8चमत्कार व बुवाबाजीवर विश्वास ठेऊ नका.
8ज्ञानी व्यक्तिंचा सहवास करा.
8भगवंताचे वेळोवेळी स्मरण करीत चला. जेंव्हा जेंव्हा तुमचे मन संसारातील गोष्टींकडे भरकटत जाईल तेंव्हा तेंव्हा त्यास प्रयत्नपुर्वक खेचुन भगवंताकडे लावा. हळुहळु सवय झाल्यावर ते आणखी कशातही गुंतणार नाही.
8परस्री व परधन यापासुन जाणिवपुर्वक दूर राहा.
8वेळोवेळी गुरुंचा सहारा घ्या. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वाटचाल करा. भक्तिमार्ग सोपा व सरळ आहे. कोणालाही कोणत्याही वयात तो सहज करण्याजोगा आहे. पण तो मार्ग गुरुंकडून नीट समजुन घ्या. कारण शुद्ध मार्ग फक्त सदुगुरुच सांगु शकतील.
8सतत गुरुंवर अवलंबुन राहु नका. त्यामुळे परावलंबी होण्याची शक्यता जास्तच. स्वतः विवेकाने व ज्ञानपुर्वक वागल्यास वैराग्य व भक्ति ही दृढ होत जाते व तीच खरी गुरुसेवा होय.
8स्वतःचे निर्णय स्वतः घ्या.
8तुमचे मन जसजसे अध्यात्मात प्रगत होऊ लागेल तसतसे विकार उसळुन तुमचा मनक्षोभ होईल. अशा वेळी धीर व संयम ठेवा. इंद्रियांच्या आहारी न जाता तटस्थ भावाने व साक्षित्वाने स्वतःचे परिक्षण करा.
8जग हे परिवर्तनशिल आहे, पण म्हणुन संसार हा अर्धवट सोडु नका. आपल्या वाट्याला जे भोग प्राप्त झालेले आहेत ते निमुटपणे स्विकारा.
8वेळोवेळी ध्यान करा. त्याचबरोबर स्वतःचेहि परिक्षण करा. आपल्या चुका ओळखुन त्यावर मात करा.
8खरा साधु निसर्ग नियमात ढवळाढवळ करत नाही. तो निसर्गाने आखुन दिलेल्या चौकटीत आनंदाने रहातो.
8रंजल्या गांजल्यात ईश्वर पहा. समाजातील तळागाळातील बंधुंची जमेल तितकी निस्वार्थी भावनेने सेवा करावी.
8खरा साधू ओळखुन त्याची भक्तिभावाने पूजा करावी. तसेच शत्रु ओळखुन त्याला वेळीच ठेचण्याचे वा प्रतिकार करण्याचे धारिष्ठ दाखवावे. दास्यत्व ईश्वराचे स्विकारावे. स्वतःच्या स्वार्थासाठी उठसुठ कोणाचे पाय धरु नये.
8उठा...... वेळ थोडा आहे. कार्य जास्त आहे. यश तुमचेच आहे. सद्गुरु सदैव तुमचे रक्षण करोत. तुमची अध्यात्मिक प्रगती होवो व स्वधर्मावरील वाटचाल ही सुखकर होवो. तुमचे मंगल होवो
......डी सिताराम