श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
|| द्वितीयः सर्गः||
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
वनामध्ये श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेवर विराधाचे आक्रमण -
रात्री त्या महर्षिंचे आतिथ्य ग्रहण करून सकाळी सूर्योदय झाल्यावर समस्त मुनिंचा निरोप घेऊन राम पुन्हा वनातच जाऊ लागले. ॥१॥ जाता जाता लक्ष्मणासहित श्रीरामांनी वनाच्या मध्यभागी एक असे स्थान पाहिले की जे नाना प्रकारच्या मृगांनी व्याप्त होते. तेथे बरीच अस्वले आणि वाघ राहात होते. तेथील वृक्ष, लता आणि झाडी नष्ट होऊन गेली होती. त्या वन प्रदेशात कुठल्याही जलाशयाचे दर्शन होणे कठीण होते. तेथील पक्षी तेथेच किलबिलाट करीत होते. रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती. ॥२-३॥ भयंकर जंगली पशुंनी भरलेल्या त्या दुर्गम वनात सीतेसह काकुत्स्थ रामांनी एक नरभक्षी राक्षस पाहिला, जो पर्वत शिखराप्रमाणे उंच होता आणि उच्चस्वरांत गर्जना करीत होता. ॥४॥ त्याचे डोळे खोल होते, तोंड फारच मोठे होते, आकार विकट आणि पोट फारच विकराळ होते. तो दिसण्यात फार भयंकर , बिभत्स, बेडौल, फारच मोठा आणि विकृत वेषाने युक्त होता. ॥५॥ त्याने रक्ताने माखलेले आणि चरबीने ओले झालेले व्याघ्रचर्म धारण केले होते. समस्त प्राण्यांना त्रास पोहोचविणारा तो राक्षस यमराजाप्रमाणे तोंड पसरून उभा होता. ॥६॥ तो एका लोखंडाच्या शूळात तीन सिंह, चार वाघ, दोन लांडगे, दहा चितकबरी हरीणे आणि दातांसहित एक मोठे हत्तीचे मस्तक ज्याला चरबी चिकटलेली हो ती गुंफून मोठमोठ्याने गर्जना करीत होता. ॥७॥ श्रीराम, लक्ष्मण आणि मैथिलीला पाहून तो क्रोधाने भरून भैरवनाद करून पृथ्वीला कंपीत करीत प्राणांतकारी काल प्रजेकडे जसा धावतो त्याप्रमाणे त्यांच्याकडे धावला. ॥८-९॥ तो वैदेहीला मांडीवर घेऊन थोडा दूर जाऊन उभा राहिला. नंतर त्या दोघा भावांना म्हणाला - ’तुम्ही दोघे जटा आणि चीर धारण करून या स्त्री बरोबर राहात आहात आणि धनुष्य-बाण आणि तलवार घेऊन दण्डकवनात घुसला आहात त्यावरून असे कळून येत आहे की तुमचे (जीवन) आयुष्य क्षीण होत चालले आहे. ॥१० १/२॥ ’तुम्ही दोघे तर तपस्वी वाटत आहात मग तुमचे तरूण स्त्री बरोबर राहाणे कसे संभव झाले ? अधर्म परायण, पापी तसेच मुनिसमुदायाला कलङ्कित करणारे तुम्ही दोघे कोण आहात ? ॥११ १/२॥ ’मी विराध नामक राक्षस आहे आणि प्रतिदिन ऋषिंचे मांस भक्षण करीत असतो आणि हातात अस्त्र-शस्त्र घेऊन या दुर्गम वनात विचरत राहात असतो. ॥१२ १/२॥ ’ही स्त्री फार सुंदर आहे, म्हणून माझी भार्या बनेल आणि तुम्हा दोघा पाप्यांचे मी युद्धस्थलावर रक्तपान करीन.’ ॥१३ १/२॥ दुरात्मा विराधाचे हे दुष्टता आणि घमेंडीने भरलेले बोलणे ऐकून जनकनंदिनी सीता घाबरून गेली आणि जसे जोराच्या वार्याने केळीचे झाड जोरजोरात हलू लागते त्या प्रकारे ती उद्वेगाने थरथर कापू लागली. ॥१४-१५॥ शुभलक्षणसंपन्न सीतेला एकाएकी विराधाच्या हातात सांपडलेली पाहून श्रीरामचंद्र सुकलेल्या तोंडाने लक्ष्मणाला संबोधित करून म्हणाले - ॥१६॥ ’सौम्य ! पहा तर खरे, महाराज जनकांची कन्या आणि माझी सती-साध्वी पत्नी सीता विवशतापूर्वक विराधाच्या अङ्गावर जाऊन पोहोचली आहे. ॥१७॥ ’अत्यंत सुखांत वाढलेली यशस्विनी राजकुमारी सीतेची ही अवस्था ! (हाय ! किती कष्टाची गोष्ट आहे) लक्ष्मणा ! वनात आमच्यासाठी ज्या दुःखाची प्राप्ती कैकेयीला अभीष्ट होती आणि जे काही तिला प्रिय होते, ज्यासाठी तिने वर मागितले होते ते सर्व आजच शीघ्रतापूर्वक सिद्ध झाले आहे. म्हणून तर ती दूरदर्शिनी कैकेयी आपल्या पुत्रासाठी केवळ राज्य घेऊन संतुष्ट झाली नाही. ॥१८-१९॥ ’जिने समस्त प्राण्यांना प्रिय असूनही मला वनात धाडून दिले, ती माझी मधली माता (आई) कैकेयी आज यावेळी सफल मनोरथ झाली आहे. ॥२०॥ ’वैदेहीला दुसरा कुणी स्पर्श करेल यापेक्षा अधिक दुःखाची गोष्ट दुसरी कुठली नाही आहे. सौमित्रा ! पित्याचा मृत्यु तसेच आपल्या राज्याचा अपहरणानेही इतके कष्ट मला झाले नव्हते जितके आता झाले आहेत.’ ॥२१॥ ’श्रीरामचंद्रांनी असे म्हटल्यावर शोकाने अश्रु ढाळीत लक्ष्मण कुपित होऊन मंत्राने अवरुद्ध झालेल्या सर्पाप्रमाणे फुस्कारत म्हणाले - ॥२२॥ ’काकुत्स्थ ! आपण इंद्राप्रमाणे समस्त प्राण्यांचे स्वामी आणि संरक्षक आहात. मी दास (येथे) उपस्थित असता आपण कशासाठी अनाथा प्रमाणे संतप्त होत आहात ? ॥२३॥ ’मी आत्ता कुपित होऊन आपल्या बाणांनी या राक्षसाचा वध करतो. आज ही पृथ्वी माझ्या द्वारे मारल्या गेलेल्या प्राणशून्य विराधाचे रक्त पिईल.’राज्याची इच्छा ठेवणार्या भरतावर माझा जो क्रोध प्रकट झाला होता, त्याला आज मी (ज्याप्रमाणे वज्रधारी इंद्र पर्वतावर आपले वज्र सोडतो त्याप्रमाणे) विराधावर सोडीन. ॥२५॥ ’माझ्या भुजांच्या बळाच्या वेगाने वेगवान होऊन सुटलेला माझा महान बाण आज विराधाच्या विशाल वक्षःस्थलावर पडेल. याच्या शरीरापासून प्राणांना वेगळा करेल. त्यानंतर हा विराध चक्कर येऊन पृथ्वीवर पडेल. ॥२६॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्ष रामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा दुसरा सर्ग पूरा झाला.
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥ ॥२॥
अरण्यकाण्डे
|| द्वितीयः सर्गः||
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
वनामध्ये श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेवर विराधाचे आक्रमण -
रात्री त्या महर्षिंचे आतिथ्य ग्रहण करून सकाळी सूर्योदय झाल्यावर समस्त मुनिंचा निरोप घेऊन राम पुन्हा वनातच जाऊ लागले. ॥१॥ जाता जाता लक्ष्मणासहित श्रीरामांनी वनाच्या मध्यभागी एक असे स्थान पाहिले की जे नाना प्रकारच्या मृगांनी व्याप्त होते. तेथे बरीच अस्वले आणि वाघ राहात होते. तेथील वृक्ष, लता आणि झाडी नष्ट होऊन गेली होती. त्या वन प्रदेशात कुठल्याही जलाशयाचे दर्शन होणे कठीण होते. तेथील पक्षी तेथेच किलबिलाट करीत होते. रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती. ॥२-३॥ भयंकर जंगली पशुंनी भरलेल्या त्या दुर्गम वनात सीतेसह काकुत्स्थ रामांनी एक नरभक्षी राक्षस पाहिला, जो पर्वत शिखराप्रमाणे उंच होता आणि उच्चस्वरांत गर्जना करीत होता. ॥४॥ त्याचे डोळे खोल होते, तोंड फारच मोठे होते, आकार विकट आणि पोट फारच विकराळ होते. तो दिसण्यात फार भयंकर , बिभत्स, बेडौल, फारच मोठा आणि विकृत वेषाने युक्त होता. ॥५॥ त्याने रक्ताने माखलेले आणि चरबीने ओले झालेले व्याघ्रचर्म धारण केले होते. समस्त प्राण्यांना त्रास पोहोचविणारा तो राक्षस यमराजाप्रमाणे तोंड पसरून उभा होता. ॥६॥ तो एका लोखंडाच्या शूळात तीन सिंह, चार वाघ, दोन लांडगे, दहा चितकबरी हरीणे आणि दातांसहित एक मोठे हत्तीचे मस्तक ज्याला चरबी चिकटलेली हो ती गुंफून मोठमोठ्याने गर्जना करीत होता. ॥७॥ श्रीराम, लक्ष्मण आणि मैथिलीला पाहून तो क्रोधाने भरून भैरवनाद करून पृथ्वीला कंपीत करीत प्राणांतकारी काल प्रजेकडे जसा धावतो त्याप्रमाणे त्यांच्याकडे धावला. ॥८-९॥ तो वैदेहीला मांडीवर घेऊन थोडा दूर जाऊन उभा राहिला. नंतर त्या दोघा भावांना म्हणाला - ’तुम्ही दोघे जटा आणि चीर धारण करून या स्त्री बरोबर राहात आहात आणि धनुष्य-बाण आणि तलवार घेऊन दण्डकवनात घुसला आहात त्यावरून असे कळून येत आहे की तुमचे (जीवन) आयुष्य क्षीण होत चालले आहे. ॥१० १/२॥ ’तुम्ही दोघे तर तपस्वी वाटत आहात मग तुमचे तरूण स्त्री बरोबर राहाणे कसे संभव झाले ? अधर्म परायण, पापी तसेच मुनिसमुदायाला कलङ्कित करणारे तुम्ही दोघे कोण आहात ? ॥११ १/२॥ ’मी विराध नामक राक्षस आहे आणि प्रतिदिन ऋषिंचे मांस भक्षण करीत असतो आणि हातात अस्त्र-शस्त्र घेऊन या दुर्गम वनात विचरत राहात असतो. ॥१२ १/२॥ ’ही स्त्री फार सुंदर आहे, म्हणून माझी भार्या बनेल आणि तुम्हा दोघा पाप्यांचे मी युद्धस्थलावर रक्तपान करीन.’ ॥१३ १/२॥ दुरात्मा विराधाचे हे दुष्टता आणि घमेंडीने भरलेले बोलणे ऐकून जनकनंदिनी सीता घाबरून गेली आणि जसे जोराच्या वार्याने केळीचे झाड जोरजोरात हलू लागते त्या प्रकारे ती उद्वेगाने थरथर कापू लागली. ॥१४-१५॥ शुभलक्षणसंपन्न सीतेला एकाएकी विराधाच्या हातात सांपडलेली पाहून श्रीरामचंद्र सुकलेल्या तोंडाने लक्ष्मणाला संबोधित करून म्हणाले - ॥१६॥ ’सौम्य ! पहा तर खरे, महाराज जनकांची कन्या आणि माझी सती-साध्वी पत्नी सीता विवशतापूर्वक विराधाच्या अङ्गावर जाऊन पोहोचली आहे. ॥१७॥ ’अत्यंत सुखांत वाढलेली यशस्विनी राजकुमारी सीतेची ही अवस्था ! (हाय ! किती कष्टाची गोष्ट आहे) लक्ष्मणा ! वनात आमच्यासाठी ज्या दुःखाची प्राप्ती कैकेयीला अभीष्ट होती आणि जे काही तिला प्रिय होते, ज्यासाठी तिने वर मागितले होते ते सर्व आजच शीघ्रतापूर्वक सिद्ध झाले आहे. म्हणून तर ती दूरदर्शिनी कैकेयी आपल्या पुत्रासाठी केवळ राज्य घेऊन संतुष्ट झाली नाही. ॥१८-१९॥ ’जिने समस्त प्राण्यांना प्रिय असूनही मला वनात धाडून दिले, ती माझी मधली माता (आई) कैकेयी आज यावेळी सफल मनोरथ झाली आहे. ॥२०॥ ’वैदेहीला दुसरा कुणी स्पर्श करेल यापेक्षा अधिक दुःखाची गोष्ट दुसरी कुठली नाही आहे. सौमित्रा ! पित्याचा मृत्यु तसेच आपल्या राज्याचा अपहरणानेही इतके कष्ट मला झाले नव्हते जितके आता झाले आहेत.’ ॥२१॥ ’श्रीरामचंद्रांनी असे म्हटल्यावर शोकाने अश्रु ढाळीत लक्ष्मण कुपित होऊन मंत्राने अवरुद्ध झालेल्या सर्पाप्रमाणे फुस्कारत म्हणाले - ॥२२॥ ’काकुत्स्थ ! आपण इंद्राप्रमाणे समस्त प्राण्यांचे स्वामी आणि संरक्षक आहात. मी दास (येथे) उपस्थित असता आपण कशासाठी अनाथा प्रमाणे संतप्त होत आहात ? ॥२३॥ ’मी आत्ता कुपित होऊन आपल्या बाणांनी या राक्षसाचा वध करतो. आज ही पृथ्वी माझ्या द्वारे मारल्या गेलेल्या प्राणशून्य विराधाचे रक्त पिईल.’राज्याची इच्छा ठेवणार्या भरतावर माझा जो क्रोध प्रकट झाला होता, त्याला आज मी (ज्याप्रमाणे वज्रधारी इंद्र पर्वतावर आपले वज्र सोडतो त्याप्रमाणे) विराधावर सोडीन. ॥२५॥ ’माझ्या भुजांच्या बळाच्या वेगाने वेगवान होऊन सुटलेला माझा महान बाण आज विराधाच्या विशाल वक्षःस्थलावर पडेल. याच्या शरीरापासून प्राणांना वेगळा करेल. त्यानंतर हा विराध चक्कर येऊन पृथ्वीवर पडेल. ॥२६॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्ष रामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा दुसरा सर्ग पूरा झाला.
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥ ॥२॥