आज आपण स्वतःला आधुनिक व सुसंस्कृत समजू शकतो, परंतु सुखी मात्र मुळीच समजु शकत नाही. झोपेच्या गोळ्याशिवाय आपण झोपु शकत नाही, जुलाबाच्या गोळ्यांशिवाय आपले पोट सोफ होत नाही, टॉनिकशिवाय आपल्या अंगात शक्ति टिकवु शकत नाही. वेदनाशामक व गुंगीच्या औषधाच्या सेवनाचे प्रमाण वाढत चालले आहे. संपत्तिच्या लालसेने आपण पाषाण ह्रदयी व हावरट बनत चाललो आहोत.शारिरिक व मानसिक आजाराचे आपण कळत नकळत शिकार होत चाललो आहोत. मानसिक दृष्ट्या कमकुवत व अपंग बनत चाललो आहोत. यातुन सावरायलाच हवे. पण सावरणार कोण.. हा मोठा यक्षप्रश्न आहे.. जो तो मानसिक दौर्बल्याची शिकार होत चालला आहे. या साऱ्यातुन सुटका करण्याची शक्ती बाहेर नसुन ती तुमच्या आमच्या शरीरातच आहे... आपल्या मनातच आहे.. पण आपण कस्तुरीमृगाप्रमाणे बाहेरच कस्तुरीचा वास शोधत आहोत..
आपले अंतर्मनच ती शक्ति आहे. या शक्तिचा प्रभाव कायिक व मानसिक पडतो. बाह्यमन एक टक्का धरलो तर अंतर्मन हो आठ टक्का धरायला पाहिजे. पाण्यात हिमशिखराचे टोक दिसते पण खरा हिमपर्वत हा पाण्यात असतो. हिमटोक हे बाह्यमन धरले तर अंतर्मन हे हिमपर्वताप्रमाणे आहे..
कोणी एक थकला भागला जीव उन्हाने हैराण झाला होता. भर दुपारची वेळ. हा एका झाडाखाली विसावला. त्याच्या मनात विचार आला.. अहाहा किती थंडगार छाया आहे ही. या ठिकाणी थंडगार पाणी असते तर किती छान झाले असते.. विचार येण्याचा अवकाश.. त्याच्यासमोर थंडगार पाणी हजर झाले.. तो चपापला.. पण ते पाणी प्याला. त्याच्या मनात विचार आला की आता खाण्याचे ताट समोर असते तर किती बरे झाले असते.. विचार करायचा अवकाश. पक्वन्नाचे ताट त्याच्यासमोर हजर झाले.. मित्रांनो ही गोष्ट सर्वांनाच माहिती असेलच. ते झाड कल्पवृक्षाचे होते. मागाल तो पदार्थ तयार करण्याचे त्याच्यात सामर्थ होते. भगवंताने अस्साच कल्पवृक्ष प्रत्येकाजवळ दिलेला आहे. फक्त त्यास आपण ओळखत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.. तो कल्पवृक्ष म्हणजेच आपले अंतर्मन होय.. होय अंतर्मनच तो कल्पवृक्ष आहे... हा विषय प्रत्येक शाळांमधुन लहानपणापासुनच शिकवला गेला पाहिजे. असे माझे स्वतःचे मत आहे.. त्यामुळे प्रत्येक जण या अंतर्मनाचे पुजारी बनतील व साहजिकच हिंसा, चोरी यांसारखे दुकर्म तरी टाळले जाईल.. पण आपल्या शिक्षण मंत्र्यांना कधी जाग येईल... आपले दुर्दैवच दुसरे काय.. पण पालकांनी ह्या विषयावर सखोल अभ्यास करुन आपल्या पाल्यांना हे लवकरात लवकर शिकवावे... ही माझी नम्र विनंती आहे.. त्यामुळे पाल्य हा सुजाण बनुन त्याच्या हातुन यौन अपराध होणार नाहीत व त्याची उर्जा नष्ट होणार नाही. पुढची पिढी तेजस्वी होईल... सुजाण पालकांनी हा विषय जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी घेतली पाहीजे.. असो....( क्रमशः )
...डी सिताराम
आपले अंतर्मनच ती शक्ति आहे. या शक्तिचा प्रभाव कायिक व मानसिक पडतो. बाह्यमन एक टक्का धरलो तर अंतर्मन हो आठ टक्का धरायला पाहिजे. पाण्यात हिमशिखराचे टोक दिसते पण खरा हिमपर्वत हा पाण्यात असतो. हिमटोक हे बाह्यमन धरले तर अंतर्मन हे हिमपर्वताप्रमाणे आहे..
कोणी एक थकला भागला जीव उन्हाने हैराण झाला होता. भर दुपारची वेळ. हा एका झाडाखाली विसावला. त्याच्या मनात विचार आला.. अहाहा किती थंडगार छाया आहे ही. या ठिकाणी थंडगार पाणी असते तर किती छान झाले असते.. विचार येण्याचा अवकाश.. त्याच्यासमोर थंडगार पाणी हजर झाले.. तो चपापला.. पण ते पाणी प्याला. त्याच्या मनात विचार आला की आता खाण्याचे ताट समोर असते तर किती बरे झाले असते.. विचार करायचा अवकाश. पक्वन्नाचे ताट त्याच्यासमोर हजर झाले.. मित्रांनो ही गोष्ट सर्वांनाच माहिती असेलच. ते झाड कल्पवृक्षाचे होते. मागाल तो पदार्थ तयार करण्याचे त्याच्यात सामर्थ होते. भगवंताने अस्साच कल्पवृक्ष प्रत्येकाजवळ दिलेला आहे. फक्त त्यास आपण ओळखत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.. तो कल्पवृक्ष म्हणजेच आपले अंतर्मन होय.. होय अंतर्मनच तो कल्पवृक्ष आहे... हा विषय प्रत्येक शाळांमधुन लहानपणापासुनच शिकवला गेला पाहिजे. असे माझे स्वतःचे मत आहे.. त्यामुळे प्रत्येक जण या अंतर्मनाचे पुजारी बनतील व साहजिकच हिंसा, चोरी यांसारखे दुकर्म तरी टाळले जाईल.. पण आपल्या शिक्षण मंत्र्यांना कधी जाग येईल... आपले दुर्दैवच दुसरे काय.. पण पालकांनी ह्या विषयावर सखोल अभ्यास करुन आपल्या पाल्यांना हे लवकरात लवकर शिकवावे... ही माझी नम्र विनंती आहे.. त्यामुळे पाल्य हा सुजाण बनुन त्याच्या हातुन यौन अपराध होणार नाहीत व त्याची उर्जा नष्ट होणार नाही. पुढची पिढी तेजस्वी होईल... सुजाण पालकांनी हा विषय जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी घेतली पाहीजे.. असो....( क्रमशः )
...डी सिताराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा