अंतर्मन हेच परब्रह्म आहे. ज्ञानदेवांचा बापरखुमादेवीवरु, तुकोबा नाम्याचा लाडका विठ्ठल म्हणजे अंतर्मनच होय. ज्ञानदेवादि भावंडे जन्मतःच मुक्त होती. त्यांचे अंतर्मन जन्मतःच जागृत झाले होते. त्यांच्या बाह्यसंज्ञा, बहिर्मनातील घडामोडी ह्या लुप्त झाल्या होत्या. त्यामुळे जगातील जाचक दुःखे बाधु शकले नाहीत. लोकनिंदा त्यांनी हसत हसत सहन केली. ज्ञानदेवांच्या हातुन काही अतर्क्य चमत्कार घडले, पण चे चमत्कार त्या त्या प्रसंगानुरुपच होते. त्यांनी निसर्ग नियमांविरुद्ध ढवळा ढवळ केली नाही.
अशा संतांनी हवेतुन वस्तु, अंगारा आदि भौतिक वस्तु काढुन लोकांना त्यांच्या नादी लावले नाही, किंवा चमत्कार त्यांनी प्रसिद्धिसाठीही केले नाहीत. कारण ते विश्वस्वप्नातुन जागे झालेले महात्मे होते. त्यांनी स्वतःला संत किंवा, अवतारी म्हणवुनही घेतले नाही. उलट ते संतांच्या दासांचाही दास म्हणवुन घेत. हे आताच्या स्वतःला संत, महाराज म्हणवणाऱ्या बाबांनी लक्षात घेतले पाहीजे. मित्रांनो, आपण डोळे उघडे ठेऊन वावरलो तर अशा नकली बाबांचे काही चालणार नाही. असो....संतांचे चमत्कार हे जनजागृतीसाठीच होते... मोठेपणा मिरवण्यासाठी नव्हते.. हे लक्षात ठेवले पाहिजे...त्यांना जगात अशक्य काहीच नव्हते.. साऱ्या जगावर त्यांची अप्रतिहत सत्ता चालत होती...कारण त्यांचे अंतर्मन हे पुर्णपणे जागृत झालेले होते. चारी मुक्ति, मोक्ष, साक्षात्कार आदि शब्द हे अंतर्मनालाच उद्देशुन आहेत. ज्यावेळी आपल्या बाह्यसंज्ञा क्षणभर का होईना बंद पडतात, किंवा, आपल्याला देहभान किंवा, विश्वभान नसते तितका वेळ अंतर्मन आपल्या बाह्य मनाचा व शरीराचा ताबा घेते. प्रत्येक जण व्यवहारात अशी स्थिती अल्पकाळ का होईना अनुभवत असतो... आपले आवडते गाणे ऐकत असतांना नकळत तंद्रावस्था लागते, त्यावेळी सभोवतालचा विसर पडतो. नंतर आपले मन खुपच आनंदित झाल्याचा अनुभव येतो... हा आनंद त्या गाण्यात नसुन तुमचे अंतर्मन क्षणभर बहिर्मनाला स्पर्श करुन जाते त्याचा तो आनंद असतो..
लहानपणी अशी तंद्रावस्था मी खुपच अनुभवली आहे.. एखादे नाटक पाहत असतांना, किंवा हरिजागर वा हरिकीर्तन ऐकत असतांना मला नकळत तंद्रावस्था लागत असे... व मला बाह्य जगाचा अत्यंत विसर पडत असे.. अशा वेळी माझे बाह्य मन पुर्ण लुप्त होई व हळु हळु माझी स्वतःची जाणीव देखील नाहिशी होत असे....माझ्या सारखेच सर्वांनाच होत असेल असे समजुन मी त्या अवस्थेकडे त्यावेळी दुर्लक्ष केले. पण तद्नंतर मात्र माझा या विषयांवरचा अभ्यास वाढला...त्यावेळी लक्षात आले की, ते बालपणीचे क्षण माझे अंतर्मन जागृतीचेच होते. मोठेपणी मात्र सदुगुरुंनी सांगितल्या प्रमाणे साधना घडल्या... त्या काळात आलेले अनुभव मात्र खुपच लोक विलक्षण होते... अर्थात ही स्थिती मला आजही येते.... काही वेळी मी जगाचेच काय पण माझेही भान हरपुन जाते... अशावेळी माझे मन अत्यंत दिव्य आनंदाचा वेध घेते.. ही सारी गुरु माऊलींचीच कृपा होय.... ....( क्रमशः )
......डी सिताराम
अशा संतांनी हवेतुन वस्तु, अंगारा आदि भौतिक वस्तु काढुन लोकांना त्यांच्या नादी लावले नाही, किंवा चमत्कार त्यांनी प्रसिद्धिसाठीही केले नाहीत. कारण ते विश्वस्वप्नातुन जागे झालेले महात्मे होते. त्यांनी स्वतःला संत किंवा, अवतारी म्हणवुनही घेतले नाही. उलट ते संतांच्या दासांचाही दास म्हणवुन घेत. हे आताच्या स्वतःला संत, महाराज म्हणवणाऱ्या बाबांनी लक्षात घेतले पाहीजे. मित्रांनो, आपण डोळे उघडे ठेऊन वावरलो तर अशा नकली बाबांचे काही चालणार नाही. असो....संतांचे चमत्कार हे जनजागृतीसाठीच होते... मोठेपणा मिरवण्यासाठी नव्हते.. हे लक्षात ठेवले पाहिजे...त्यांना जगात अशक्य काहीच नव्हते.. साऱ्या जगावर त्यांची अप्रतिहत सत्ता चालत होती...कारण त्यांचे अंतर्मन हे पुर्णपणे जागृत झालेले होते. चारी मुक्ति, मोक्ष, साक्षात्कार आदि शब्द हे अंतर्मनालाच उद्देशुन आहेत. ज्यावेळी आपल्या बाह्यसंज्ञा क्षणभर का होईना बंद पडतात, किंवा, आपल्याला देहभान किंवा, विश्वभान नसते तितका वेळ अंतर्मन आपल्या बाह्य मनाचा व शरीराचा ताबा घेते. प्रत्येक जण व्यवहारात अशी स्थिती अल्पकाळ का होईना अनुभवत असतो... आपले आवडते गाणे ऐकत असतांना नकळत तंद्रावस्था लागते, त्यावेळी सभोवतालचा विसर पडतो. नंतर आपले मन खुपच आनंदित झाल्याचा अनुभव येतो... हा आनंद त्या गाण्यात नसुन तुमचे अंतर्मन क्षणभर बहिर्मनाला स्पर्श करुन जाते त्याचा तो आनंद असतो..
लहानपणी अशी तंद्रावस्था मी खुपच अनुभवली आहे.. एखादे नाटक पाहत असतांना, किंवा हरिजागर वा हरिकीर्तन ऐकत असतांना मला नकळत तंद्रावस्था लागत असे... व मला बाह्य जगाचा अत्यंत विसर पडत असे.. अशा वेळी माझे बाह्य मन पुर्ण लुप्त होई व हळु हळु माझी स्वतःची जाणीव देखील नाहिशी होत असे....माझ्या सारखेच सर्वांनाच होत असेल असे समजुन मी त्या अवस्थेकडे त्यावेळी दुर्लक्ष केले. पण तद्नंतर मात्र माझा या विषयांवरचा अभ्यास वाढला...त्यावेळी लक्षात आले की, ते बालपणीचे क्षण माझे अंतर्मन जागृतीचेच होते. मोठेपणी मात्र सदुगुरुंनी सांगितल्या प्रमाणे साधना घडल्या... त्या काळात आलेले अनुभव मात्र खुपच लोक विलक्षण होते... अर्थात ही स्थिती मला आजही येते.... काही वेळी मी जगाचेच काय पण माझेही भान हरपुन जाते... अशावेळी माझे मन अत्यंत दिव्य आनंदाचा वेध घेते.. ही सारी गुरु माऊलींचीच कृपा होय.... ....( क्रमशः )
......डी सिताराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा