शनिवार, ९ एप्रिल, २०११

सुनामी

जपानच्या सागर किनारी
धरणीकंप झाला
लाटा उसळल्या गगनचुंबी
काल स्तब्ध झाला

नसे कोणाला माहित यातले
सारे सुरळीत होते
उद्याची चिंता मनी ठेऊनी
व्यवहार करीत होते

साऱ्या जगाशी स्पर्धा तयांची
विसरुनी गतकाल
ताठ मानेने उभा राहीला
होता उषःकाल

परि तयांचे नशिबी अजुनी
भोग सरले नव्हते
होऊनी काळ कृतांत लाटा
सारे केले वाहते

होते नव्हते वाहुन गेले
संसार उघडा झाला
पाहुनी करुण दृश्य तयांचे
यमही थरकापला

      ......डी सिताराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: